प्रभावी जनसंपर्कातून प्रशासनाची प्रतिमा उंचवावी - उपसंचालक डॉ. संभाजी खराट
सिंधुदुर्गनगरी दि. 24 (जिमाका): प्रभावी जनसंपर्कातून प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख करुन प्रशासनाची प्रतिमा उंचवावी, असे मार्गदर्शन कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी सांगितले.
उपसंचालक डॉ. खराट यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयाला भेट देवून मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी माहिती सहाय्यक हेमंतकुमार चव्हाण, एकनाथ पोवार, दूरमुद्रणचालक रवींद्रकुमार चव्हाण, लिपीक-टंकलेखक संदिप राठोड, सर्वसाधारण सहाय्यक रवींद्र देवरे, रोनिओ ऑपरेटर अविनाश होडावडेकर, शिपाई महेंद्र भालेकर उपस्थित होते.
उपसंचालक डॉ. खराट यांनी यापूर्वी मुंबई, कोल्हापूर, कोकण भवन, रत्नागिरी, ठाणे, मंत्रालय याठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी तसेच मंत्रालयात वरिष्ठ सहायक संचालक पदाची जबाबदारी सांभाळली आहे. माहिती व जनसंपर्क विभागात समाज माध्यमांचा वापर अधिक प्रभावीपणे करण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. तसेच शासनाचे मुखपत्र असणाऱ्या लोकराज्य मासिकाच्या संपादकाचे कामही त्यांनी यशस्वीरित्या केले आहे. डॉ.खराट यांनी पत्रकारितेत पीएच. डी. केली असून त्यांची 25 पुस्तके प्रसिध्द झालेली आहेत.
पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करु
अधिस्वीकृती, शासनमान्य यादी, सन्मान योजना त्याचबरोबर पत्रकारांचे इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही उपसंचालक डॉ. खराट यांनी दिली.
जिल्हा पत्रकार संघाला डॉ. खराट यांनी आज भेट देवून चर्चा केली. यावेळी मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर यांनी पुष्पगुच्छासह गुलाब पुष्प देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. खराट यांनी पत्रकारांसाठी असणाऱ्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाळ खडपकर यांनी शेवटी आभार मानले. यावेळी मुख्यालय पत्रकार संघाचे सचिव नंदकुमार आयरे, जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव देवयानी ओरसकर, तसेच सर्व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी दत्तप्रसाद वालावलकर, रवी गावडे, संदिप गावडे, विनोद दळवी, मनोज वारंग, शांताराम राऊत, छायाचित्रकार सतीश हरमळकर आदी उपस्थित होते.
सोबत : फोटो.
0000000
राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग (जिमाका) दि. 29 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते. यापूर्वी पिकस्पर्धेची सर्व प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी, खरीप हंगाम २०२६ पासून पिकस्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली (Online Portal) सुरू करण्यात आलेली आहे.त्यानुषंगाने अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वसाधारण ...


Comments
Post a Comment