पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) - महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व इतर जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरामुळे खुप मोठी जिवीतहानी व नुकसान झालेले आहे. कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. महापुरामुळे, दरड कोसळल्यामुळे व लॉकडाऊनमुळे महाराष्टात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, गरीब व कष्टकरी, मजूंर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यससाठी, त्यांना जीवनावश्यक वस्तु अन्नधान्य , औषधोपचाराची इ. मदत करण्याची आणि मा. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आर्थिक स्वरुपात मदत करण्याची आवश्यकता आहे.
या जिल्ह्यामधील नोंदणीकृत न्यासांना आवाहन अरण्यात येते की, आपण सढळहस्ते गरजुंना आर्थिक व वस्तुरुपाने मदत करावी . असे आवाहन एम.एस.निकम सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment