'हर घर नल जल से जल' जल जीवन मिशन कामकाजाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का.) हर घर नल से जल 2024 पर्यंत ग्रामीण भागांतील प्रत्येक घरात व्यैयक्तीक नळ जोडणीव्दारे किमान 55 लिटर प्रती दिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन चे प्रमुख उद्दिष्ट आहे. या अंर्तगत होत असणाऱ्या कामकाजाचा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज आढावा घेतला. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, वरिष्ठ भूवैज्ञानिक सागर देसाई, जल संधारणचे कार्यकारी अभियंता यु.आर.महाजनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियांता नितीन उपरेलू, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता संतोष सावर्डेकर उपस्थित होते. एकूण 431 ग्रामपंचायती असून देण्यात आलेली नळ जोडणीची संख्या 1 लाख 25 हजार 87 इतकी आहे. सन 2022-23 च्या कृती आराखड्या नुसार 733 योजना आहेत. त्याची किंमत 330.69 कोटी इतकी आहे. तयार करण्यात आलेली अंदाज पत्रिके 627 (371.23 कोटी) तांत्रिक मान्यता दिलेल्या योजना 566(318.98 कोटी) प्रशासकीय मान्यता दिलेल्या योजना 407(177.44 कोटी) निविदा प्रक्रीया केलेल्या योजना 276(88.09कोटी) कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या योजना 168 (33.99 कोटी) . केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, जल जीवन मिशनमध्ये समाविष्ट करून पुनःर्रचना करण्यात आली आहे. यानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना 2024 पर्यंत 'हर घर नल से जल' प्रमाणे पाणीपुरवठा करण्यास शासन कटीबद्ध आहे. प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जलजीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानुसार प्रगतीपथावर असणाऱ्या योजनांची कामे पूर्ण करून या मिशनअंतर्गत जिल्ह्याला अग्रेसर ठेवावे, असे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'