तिलारी प्रकल्पात 81.50 टक्के पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का.)- - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 2 हजार 659.196 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 364.589 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.50 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 109.04 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-5414.90, अरुणा -4.4800, कोर्ले- सातंडी -25.4740 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-2.648, नाधवडे-2.572, ओटाव-1.290, देंदोनवाडी – 0.908, तरंदळे -2.729, आडेली-1.288, आंबोली – 1.725, चोरगेवाडी– 1.713, हातेरी- 1.963, माडखोल -1.690, निळेली -1.747, ओरोस बुद्रुक-1.018, सनमटेंब- 2.390, तळेवाडी- डिगस- 0.931, दाभाचीवाडी- 1.397, पावशी- 3.030, शिरवल -3.680, पुळास -1.508, वाफोली – 1.688, कारिवडे – 0.941, धामापूर – 1.541, हरकूळ -2.380, ओसरगाव – 0.854, ओझरम – 1.819, पोईप – 0.806, शिरगाव – 0.338, तिथवली – 1.122, लोरे- 2.696 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे-1.584, शिरवळ-0.513, वर्दे-0.000, कोकीसरे-0.301, नानीवडे- 0.395, सावडाव-0.292, जानवली-0.650 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग (जिमाका) दि. 29 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते. यापूर्वी पिकस्पर्धेची सर्व प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी, खरीप हंगाम २०२६ पासून पिकस्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली (Online Portal) सुरू करण्यात आलेली आहे.त्यानुषंगाने अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वसाधारण ...
Comments
Post a Comment