'पहिले पाऊल- शाळापूर्व तयारी' अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे : शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर
मुंबई : राज्य शासनाकडून आदर्श माता घरोघरी घडवण्याचं काम 'पहिले पाऊल- शाळापूर्व तयारी' अभियानांतर्गत सुरु आहे. या अभियानात आवर्जून सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा आणि महाराष्ट्राचं भविष्य घडवण्याच्या दृष्टीनं पुढची पिढी आपणच सक्षम बनवूया. असं आवाहन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.श्री.दीपकजी केसरकर यांनी केलं आहे.
महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊ आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा लाभलेला आहे.
हाच वारसा पुढे चालवण्यासाठी सुरु केलेल्या अभियानाला गेल्यावर्षी सुरवात झाली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे मुलांच्यात 40% प्रगती आढळून आली. यंदाच्या वर्षी देखील अडीच लाख माता पालक गट आणि १४ लाखांहून अधिक मुलांचा सहभाग या अभियानात नोंदवला जात आहे.
नवीन शैक्षणिक धोरणात नर्सरी, ज्युनियर, सिनियर के. जी. यांचा समावेश केला आहे. यामध्ये मुलांची काळजी घेण्याबरोबरच मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, अक्षर, अंक याची ओळख, व्यक्तिमत्व विकास याची माहिती व्हावी. म्हणजे प्रवेश करतानाच मुले सक्षमपणे अभ्यास करू शकतील. म्हणूनच यंदाही मातांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी या अभियानात सहभागी होऊन आपले योगदान द्यावं.
याबरोबरच लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी व नागरिक यांनीही 'पहिले पाऊल-शाळापूर्व तयारी' या अभियानात आवर्जून आपला सहभाग नोंदवावा. यातून महाराष्ट्राचं भविष्य घडवण्याच्या दृष्टीनं पुढची पिढी आपणच सक्षम बनवूया, असं आवाहन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.श्री.दीपकजी केसरकर यांनी केलं आहे.
राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग (जिमाका) दि. 29 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते. यापूर्वी पिकस्पर्धेची सर्व प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी, खरीप हंगाम २०२६ पासून पिकस्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली (Online Portal) सुरू करण्यात आलेली आहे.त्यानुषंगाने अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वसाधारण ...
Comments
Post a Comment