आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी 30 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत - प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव

सिंधुदुर्गनगरी, दि. 7 (जि.मा.का): भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. 30 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावेत. तसेच या योजनेंतर्गत जमीन विक्रीसाठी इच्छुक जमीन मालकाने 7/12 व 8 अ इ. कागदपत्रे जोडून परिपूर्ण प्रस्ताव दि. 30 डिसेंबर 2021 पर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, जि. रायगड येथे सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी केले. आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन आदिवासी कुटुंबांना 4 एकर जिरायती ( कोरडवाहू ) किंवा 2 एकर बागायती (ओलिताखालील ) जमीन देण्याबाबत प्रस्तावित आहे. ही योजना 100 टक्के अनुदानित आहे. या योजनेंतर्गत निवड करावयाच्या लाभार्थ्यांचे प्राधान्य देण्यात येणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत. दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन आदिवासी परितक्त्या स्त्री, दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन आदिवासी विधवा स्त्री, भूमिहीन कुमारी माता, भूमिहीन आदिम जमाती, भूमिहीन पारधी. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे - लाभार्थ्याचे जात प्रमाणपत्र, लाभार्थ्याचे दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र ( ग्रामसेवकाचे), लाभार्थ्याचे वय किमान 18 व कमाल 60 इतके असावे, लाभार्थी त्या गावचा रहिवासी असावा ( ग्रामसेवक व सरपंच एकत्रित दाखला) दारिद्र्यरेषेखालील यादीत त्याच्या नावाची नोंद असावी, शाळा सोडल्याचा दाखला, वयाचा दाखला, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला. पात्र लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, जि. रायगड या कार्यालयातून कोरे अर्ज घेऊन जावेत व परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. 30 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावेत. भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन विक्रीसाठी इच्छुक जमीन मालकाने 7/12 व 8 अ इ. कागदपत्रे जोडून परिपूर्ण प्रस्ताव दि. 30 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, जि. रायगड दूरध्वनी क्र. 02143 - 252519 येथे संपर्क करावा. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'