पात्र लाभार्थ्यांनी तीन महिन्यांचे धान्य उचलावे, अन्यथा शिधापत्रिका होईल रद्द किंवा केशरीमध्ये वर्ग
सिंधुदुर्गनगरी, दि.10 (जि.मा.का.): पात्र अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थ्यांनी तीन महिन्यांचे धान्य दिनांक 30 जून 2025 पुर्वीपर्यंत संबंधित रास्त भाव धान्य दुकानदारांकडून उचल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, अद्यापही जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांनी धान्य उचल न केल्याचे निदर्शनास आले आहे. तरी जुलै 2025 महिन्यात सुध्दा ई-पॉस मशीनवरुन धान्य उचल करण्याची सुविधा सुरु असल्याने ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही धान्य उचल केलेली नाही, अशा लाभार्थ्यांनी तात्काळ धान्य उचल करावी, जे लाभार्थी धान्य उचल करणार नाहीत, अशा लाभार्थ्यांना धान्याची गरज नसल्याची बाब समजून त्यांच्या प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय शिधापत्रिका (APL) केशरी (NPH) मध्ये वर्ग करुन अथवा शिधापत्रिका रद्द करुन त्यांना धान्याचा लाभ घेता येणार नाही याची गंभीरपणे नोंद घेण्यात यावी.
00000
Comments
Post a Comment