कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दिनांक १८ (जिमाका) :- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता १० वी ची दि. २१ फेब्रुवारी २०२५ ते दि. १७ मार्च २०२५ या कालावधीत सुरु होत आहेत. इ. १० वी च्या परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ४१ परिक्षा केंद्र आहेत, या परीक्षेसाठी एकूण ९ हजार ६ विद्यार्थी प्रविष्ठ होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कविता शिंपी यांनी दिली आहे.
इयत्ता १० वी ची परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीतपणे पार पाडावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यकमांतर्गत, शिक्षणमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली इ. १२ वी व इ. १० वीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विभाग तथा पालकमंत्री नितेश राणे आपणास पुढील आवाहन करीत आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री, सहपालकमंत्री पालकसचिव म्हणून आपणास पुढील आवाहन करीत आहे.
तुमच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेस सामोरे जावे, यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत आहे. भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून ते तुमच्या ज्ञानवृध्दी आणि जीवन घडविण्याचे साधन आहे. समाजाच्या उज्वल भविष्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की, स्वत:च्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करा. विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळावे तसेच त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल यासाठी पालक व शिक्षकांनी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांची मानसिक तयारी करावी.
आगामी परीक्षा काव्यत कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केद्र भयमुक्त व कॉपीमुक्त राहतील यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी कटीबघ्द आहे. परीक्षांच्या धर्तीवर राज्यामध्ये कॉपी प्रकरणास पूर्णत: प्रतिबंध करण्यासाठी व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त आणि पारपदर्शक परीक्षा प्रक्रीयेसाठी जिल्हा प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत
महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी आपा सर्वजण मिळून प्रामाणिकतेने आणि न्याय मार्गाने शिक्षणाला पुढे नेऊयात !
०००००
Comments
Post a Comment