नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई – केवायसी करुन घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का):- जिल्ह्यात सन 2025-26 वर्षामध्ये अवकाळी पाऊस, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिके, शेतजमीन, बियाणे व तद्अनुषंगिक बाबी ईसाठी झालेल्या नुकसानाकरीता शासनाकडून नुकसान भरपाईचा निधी पुढीलप्रमाणे प्राप्त झाला आहे. शासन निर्णय दिनांक नुकसानीचा महिना मंजूर निधी (रक्कम रुपये) 12.09.2025 जून 2025 नुकसान 12,63,000/- 4.11.2025 जून ते सप्टेंबर 2025नुकसान (बियाणे व इतर) 15,94,000/- 17.10.2025 ऑगस्ट 2025 नुकसान 4,79,000/- 22.07.2025 फेब्रुवारी ते मे 2025 नुकसान 54,41,000/- 18.10.2025 सप्टेंबर 2025 नुकसान 8,29,000/- 17.10.2025 जून 2025 नुकसान (शेतजमीन) 88,000/- 13.10.2025 जुलै 2025 नुकसान 97,000/- 08.12.2025 ऑक्टोंबर 2025 नुकसान 4,08,69,000/- एकूण 5,06,60,000/- या नुकसान भरपाईची रक्कम ही ई- केवायसीव्दारे लाभार्थ्यांना वाटप होत असून यासाठी शेतकरी, लाभार्थींनी आपल्या तहसिल, तलाठी कार्यालयातून VK क्रमांक (विशिष्ट क्रमांक) प्राप्त करुन घेऊन जवळच्या महा –ई सेवा केंद्रावर जाऊन स्वत:ची ई- केवायसी करुन घ्यावी. यानंतरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे. तरी नुकसान भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात जमा होण्याच्या अनुषंगाने नुकसान ग्रस्त शेतकरी, लाभार्थींनी तलाठी, तहसिल कार्यालय, नजीकच्या महा ई- सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र येथे भेट देऊन आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करावी, असे आवाहन जिल्ह्यातील सर्व संबंधित लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'