सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राज्य शासनाकडून गौरव उत्कृष्ट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा मान

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का): जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४-२५ चा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करण्यात आला. या आराखड्यास राज्य शासनाकडून उत्कृष्ट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा म्हणून गौरविण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सतीश कुमार खडके (भा.प्र.से) यांच्या स्वाक्षरीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांना प्रशस्तीपत्र (letter of appreciation) देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व जिल्ह्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून प्राप्त झालेले होते. या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन आराखड्याच्या अमंलबजावणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांचे अभिनंदन केले. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'