संवेदनशील क्षेत्र घोषित गावांना आक्षेप नोंदविण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) : केंद्र शासनाचे पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशीन क्षेत्र घोषित करण्यासाठी क्र. So३०६० (इ) दि.31 जुलै 2024 अन्वये मसूदा अधिसूचना जारी केलेली आहे. सदर अधिसूचना https://egazette.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रस्तूत मसूदा अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील 13 जिल्हे व 56 तालुके अंतर्गत 2515 गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. त्यापैकी सिधुदुर्ग जिल्ह्यातीत सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड, वैभववाडी या 5 तालुक्यातील 198 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.
राज्यातील पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केल्यास ज्या स्थानिक रहिवासीना त्याचा परिणाम होणार आहे, त्यांनी Environment Protection Act, 1986 व नियम 1986 मधील तरतूदीनुसार त्यांचे आक्षेप 60 दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली- 110003 यांचेकडील esz-mef@nic.in या ईमेल आयडीवर आक्षेप नोंदविणे आवश्यक आहे.
०००००
Comments
Post a Comment