गोर-गरीब लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी सर्वेक्षण करा
- अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का) : शिधापत्रिका धारकांना पत्ता बदलला असता नवीन ठिकाणी अन्न सुरक्षा लाभ मिळण्याबाबत काही कारणास्तव अडचणी निर्माण होत आहेत. गोर-गरीब लाभार्थी अन्न सुरक्षा योजनेबाबत वंचित राहता कामा नये यासाठी सर्वेक्षण करा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी दिले.
जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक आज घेण्यात आली. श्री. बर्गे म्हणाले, तालुकास्तरीय दक्षता समितींच्या कामांचा आढावा घ्या. समित्यांची दरमहा बैठक होते का? या बाबत माहिती घ्यावी. धान्य साठवणूकीची क्षमता आणि व्यवस्था याबाबत आढावा घ्यावा. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राहिलेली कामे पाठपुरावा करू पूर्ण करून घ्यावी.
नायब तहसिलदार संजय गवस यांनी यावेळी माहिती दिली. बैठकीला सदस्य मेघनाथ धुरी यांच्यासह अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग (जिमाका) दि. 29 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते. यापूर्वी पिकस्पर्धेची सर्व प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी, खरीप हंगाम २०२६ पासून पिकस्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली (Online Portal) सुरू करण्यात आलेली आहे.त्यानुषंगाने अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वसाधारण ...
Comments
Post a Comment