परमहंस भालचंद्र महाराज संस्थांनच्या विकासकामांचे
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.- 28 : जिल्हा वार्षिक योजना (पर्यटन ) अंतरग्त निधीतून झालेल्या परमहंस भालचंद्र महाराज संस्थांनच्या विकास कामांचे भूमिपूजन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, संस्थांनचे अध्यक्ष सुरेश कामत, व्यवस्थापक विजय केळूसकर, सतीश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या समोर कायमस्वरुपी भव्य मंडप उभारणे यासह संस्थानच्या विकास कामांसाठी पर्यटन अंतर्गत जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी देण्यात आला आहे. या विकास कामांचे आज भूमिपूजन झाले.
* सोबत फोटो जोडला आहे.
राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग (जिमाका) दि. 29 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते. यापूर्वी पिकस्पर्धेची सर्व प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी, खरीप हंगाम २०२६ पासून पिकस्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली (Online Portal) सुरू करण्यात आलेली आहे.त्यानुषंगाने अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वसाधारण ...


Comments
Post a Comment