सिरमचे 'कोविशिल्ड' व्हॅक्सिन जिल्ह्यात दाखल
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि.- 14 : कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी जिल्ह्यात कोरोनाची लस दाखल झाली आहे. कोल्हापूर येथून वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी संतोष व्हटकर हे आज संध्याकाळी लस घेऊन जिल्ह्यात दाखल झाले.
शनिवार दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथे लसीकरणाचा शुभारंभ होणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात 10 हजार 260 डोसेस लस उपलब्ध झाली आहे. यातून साडे चार हजार लाभार्थींना लस देण्यात येणार आहे.
ही मोहीम जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी, व उपजिल्हा रुग्णालय, कणकवली या तीन संस्थांमध्ये सुरू होत आहे. या तिन्ही संस्थांमध्ये यापूर्वी नोंदणी केलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना कोविड प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. शुभारंभाच्या दिवशी या तिन्ही संस्थांमध्ये प्रत्येकी 100 लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा आरोग्य विभागाच्या औषध भांडार येथील शितगृहांमध्ये सध्या या लसीची साठवणूक करण्यात आली आहे. लस जिल्ह्यात दाखल झाली त्यावेळी डॉ. संदेश कांबळे, वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी संतोष व्हटकर यांच्यासह औषध भांडार येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लसीकरणासाठी आवश्यक सर्व साधनसामुग्री, साहित्या याबाबतची पूर्वतयारी संस्थास्तरावर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.
* सोबत फोटो जोडला आहे.
फोटो ओळ 1) सिंधुदुर्गनगरी, ओरोस फाटा येथे लस घेऊन येणारी व्हॅन दाखल.
2) लस ओषध भांडार येथील शितगृहामध्ये नेण्यात येत असताना.
3) औषध भांडार येथील शितगृह व डिपफ्रिजरमध्ये लस साठवणूक करण्यात येत असताना.
00000
--
राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग (जिमाका) दि. 29 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते. यापूर्वी पिकस्पर्धेची सर्व प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी, खरीप हंगाम २०२६ पासून पिकस्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली (Online Portal) सुरू करण्यात आलेली आहे.त्यानुषंगाने अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वसाधारण ...






Comments
Post a Comment